शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू अन्यत्याग आंदोलनाला बसले होते. त्यानंतर बच्चू कडू यांनी आज सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं. शेतकऱ्या कर्जमाफी मिळावी, या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, 'बच्चू कडू यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे मी त्यांना आंदोलन थांबविण्यासाठी संपर्क साधला. त्यामुळे त्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. शेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिले आहे. त्यामुळे अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला वेळ हवाय. त्यासाठी एक समिती गठित करणार आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.