प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन पुकारले होते. कर्जमाफीची तारीख सांगत नाही तो पर्यंत नागपूर हायवे जाम करू आणि रेल रोको करू असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर त्यांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली आणि कर्जमाफीसाठी एक समिति गठित केली जाईल तसेच 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये परतले आणि या आंदोलनाला पूर्णविराम दिला. यानंतर कडू यांनी जोरदार भाषण केले. आमच्या मागे कार्यकर्ते आहे, मागे असणारे जे कार्यकर्ते आहे त्यांचं नाव येत नसेल तरी कर्तृत्व मोठ आहे.
ही लढाई तुम्ही जिंकली आहे. एकीचं बळ किती मोठं असते. 13 महिने पंजाबचे आंदोलन चालले. आपण तीन दिवस चालवले. 31 वर्षानंतर सर्वात मोठं आंदोलन होतं. एकीचं बळ आहे. प्रचंड ताकदीने सर्वच मेहनतीने उभं राहिलं. असे बच्चू कडु म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.