राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांनी सातपुडा हा सरकारी बंगला अद्याप सोडलेला नाही. मंत्रिपदी नसताना ते अद्याप या सरकारी बंगल्यावर वास्तव्यास आहेत. त्यामुळं आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
विविध आरोपांची राळ उठल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंडे हे मंत्रिपदी असताना सातपुडा या सरकारी बंगल्यात राहत होते. आता मंत्रिपद जाऊन अनेक महिने लोटले आहेत. त्यानंतरही ते सातपुडा या सरकारी निवासस्थानी वास्तव्यास आहेत. त्यांनी अद्याप बंगला रिकामा केला नाही. यावरून राजकारणही पेटले होते. अंजली दमानिया यांनी हे प्रकरण लावून धरले होते. दोनच दिवसांपूर्वी दमानिया यांनी हा बंगला रिकामा करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. या कालावधीत मुंडेंनी बंगला रिकामा केला नाही तर कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल, असं सांगितलं होतं. मुंडेंनी हा बंगला रिकामा करावा यासाठी दमानिया यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.