Maharashtra Politics: जलसंपदाचे निर्णय कंबोज घेतात, या बड्या नेत्याचा गंभीर आरोप

Ambadas Danve On Mohit Kamboj: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सध्या रोजच अधिवेशनामध्ये विरोधक हे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहे.

अंबादास दानवे यांनी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील निर्णय अधिकाऱ्यांऐवजी मोहित कंबोज घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, जलसंपदा विभागातील उच्च अधिकाऱ्यांशी मोहित कंबोज यांचे संबंध तपासले जावेत आणि त्यांचे संभाषण तसेच सीडीआरची चौकशी करण्यात यावी.

त्यांनी असा आरोप केला की, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी दीपक कपूर हे मोहित कंबोज यांच्या संमतीशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत. तसेच, जलसंपदा विभागातील कामकाजावरही मोहित कंबोज यांच्याच प्रभावाचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. "मोहित कंबोज कोण आहेत? आणि त्यांना या विभागात हस्तक्षेप करण्याची परवानगी कोणी दिली?" असा सवाल उपस्थित करत, त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com