Alandi News : "आळंदीत कत्तलखाने होऊ देणार नाही" मुख्यमंत्र्यांचं वारकऱ्यांना आश्वासन |VIDEO

CM Devendra Fadnavis : वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना ठोस आश्वासन दिले आहे.

आळंदीतील मंदिर परिसरात सुरु असलेल्या कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी जोरदार आवाज उठवला आहे. धार्मिक श्रद्धा व भक्तीस्थळाच्या पवित्रतेच्या रक्षणासाठी कत्तलखाने त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने प्रतिक्रिया देत आश्वासन दिलं आहे की, "कोणत्याही परिस्थितीत आळंदीमध्ये कत्तलखाने होऊ देणार नाही."

वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनानाही याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्दश देण्यात आले आहेत. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पावन क्षेत्र असून, येथे कोणताही अश्रद्धा प्रकार चालणार नाही, असं फडणवीस म्हणाले. या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com