आकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील कोळासा येथे ढगफुडी सदृश्य पाऊस झाला होता. यामुळे कोळासा आणि मनारखेड शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.शेतकरी संदीप घोंगे यांच्या शेतातील साडेचार एकरांपैकी तब्बल दोन एकरात ६ ते ७ फूट पाणी साचले असून त्यामध्ये सोयाबीनचं पीक पूर्णतः वाया गेल आहे. परिणामी, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
विशेष म्हणजे,या पाण्यामध्ये चक्क शेतकरी आपल्या पाण्यात उतरून किती फूट पाणी आहे, याच प्रात्यक्षिक दाखवत आहे.याशिवाय, या शेतशिवारालगत असलेल्या पारस औष्णिक वीज प्रकल्पाने राख बाजूला टाकल्यामुळे शेतात साचलेल्या पाण्याला वाहून जाण्यास मार्गच उरलेला नाही. वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने देऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.