कल्याणची घटना दुर्दैवी आहे. गेल्या महिन्यात देखील मारवाडी बोलण्यावरून असाच वाद मुंबईत झाला होता. मुंबई, महाराष्ट्र आमचा आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची मग देशाची आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये काल एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त करत घटनेचा निषेध केला. शुक्रवारी ते माध्यमांशी बोलत होते. हे सरकार या वादाला हवा देते आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मराठी माणसावर हल्ला करणाऱ्यांवर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली पाहिजे, अशी मागणी करत यापूर्वी मराठी-अमराठी हे वाद कधी नव्हते. आता हा प्रकार कुठून आला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबईत सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. राज्यात कोणी व्हेज - नॉन व्हेज सोसायटी करत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे. अशा हौसिंग सोसायटीवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.