वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून आज राज्यसभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकार जमीन खरेदी-विक्रीच्या व्यापारात गुंतले असल्याचा आरोप त्यांनी केला. शेवटी तुम्ही खरेदी-विक्रीच्या मुद्यावर आलाच. ज्या गोष्टीची भीती होती ती अखेर केलीच. जमिनी विकूनच हे सरकार शांत बसेल असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राऊत यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा संदर्भ देत सरकारवर टीकास्त्र सोडले. धारावीच्या बाबतीत जे झाले, तेच या सरकारला या जमिनींचे करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, अयोध्येत 13 हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये 300 किलो सोनं जप्त झालं आहे. तुम्ही हिंदू मंदिरांच्या जमिनींचे रक्षण करू शकत नाही, डिफेन्सची जमीनही या सरकारने विकली. ती नेमकी कोणाला विकली? असा सवालही त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.