Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर
team indiatwitter

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर

Team India Latest News: भारतीय संघातील खेळाडू अजूनही मायदेशी परतलेले नाहीत. दरम्यान आता बारबाडोसमधून लेटेस्ट अपडेट समोर आली आहे.
Published on

भारतीय संघाने बारबाडोसमध्ये इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकपविजेत्या भारतीय संघाचं मायदेशात जंगी स्वागत होणार आहे. मात्र भारतीय संघ अजूनही बारबाडोसमधून निघू शकलेला नाही. भारतीय खेळाडू मंगळवारी भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. मात्र चक्रीवादळामुळे बारबाडोसमध्ये कर्फ्यु लावण्यात आला आहे.

यापूर्वी भारतीय खेळाडू आधी दुबई मग दुबईवरून दिल्लीला येणार होते. मात्र चक्रीवादळामुळे हा प्लान फ्लॉप झाला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोय केली असल्याचं माध्यमातील वृतांमध्ये म्हटलं जात आहे. मात्र खराब हवामानामुळे भारतात येण्यासाठी आणखी उशीर होऊ शकतो.

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघातील खेळाडू मंगळवारी चार्टर्ड विमानाने भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. हे खेळाडू बुधवारी संध्याकाळी भारतात पोहोचतील असं म्हटलं जात होतं. मात्र अजूनही भारतीय खेळाडू बारबाडोसमध्येच अडकून आहेत. आता भारतीय खेळाडू भारतात केव्हा परतणार आणि पुढे काय प्लान आहे, याबाबत बीसीसीआयकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Team India: वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला 'चक्रीवादळाने' घेरलं; भारतात केव्हा परतणार? मोठी अपडेट आली समोर
IND vs SA, Final: हार्दिकला विसरून कसं चालेल? आयपीएलचा व्हिलन ते वर्ल्डकपचा हिरो

फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव

बारबाडोसमध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ भिडले होते. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून रोहित, सूर्या आणि रिषभ पंत फ्लॉप ठरले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेलने ७६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पहिल्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने ४७ धावा केल्या. या खेळीच्या बळावर संघाची धावसंख्या १७६ धावांवर पोहोचवली. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ७ धावांनी माघारी राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com