Team India News: रिषभ पंत, यश दयालला संधी; BCCI ने या 3 स्टार खेळाडूंकडे केलं दुर्लक्ष

IND vs BAN 1st Test: बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
Team India News: रिषभ पंत, यश दयालला संधी; BCCI ने या 3 स्टार खेळाडूंकडे केलं दुर्लक्ष
shreyas iyeryandex
Published On

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २ हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तसेच यश दयालचा देखील कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान काही असे देखील खेळाडू आहेत, जे या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होते, मात्र त्यांना दुर्लक्ष करण्यात आलं आहे.

मुशीर खान

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी सरफराज खानचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याचा धाकटा भाऊ मुशीर खानचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. १९ वर्षीय मुशीर खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत शतक आणि दुहेरी शतक झळकावलं होतं. यासह दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने १८१ धावांची वादळी खेळी केली आहे. त्यामुळे तो देखील या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार होता.

Team India News: रिषभ पंत, यश दयालला संधी; BCCI ने या 3 स्टार खेळाडूंकडे केलं दुर्लक्ष
IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा! Rishabh Pantचं कमबॅक, तर या प्रमुख गोलंदाजाला बसवलं

श्रेयस अय्यर

भारतीय संघातील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरलाही बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत दुर्लक्ष करण्यात आलं आहे. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत श्रेयस अय्यर इंडिया डी संघाचं नेतृत्व करतोय. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रेयसला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावात त्याने अनुक्रमे ९ आणि ५४ धावा केल्या आहेत.

Team India News: रिषभ पंत, यश दयालला संधी; BCCI ने या 3 स्टार खेळाडूंकडे केलं दुर्लक्ष
IND vs BAN Test Series: टीम इंडियात नव्या खेळाडूंची एन्ट्री; कोण आहे यश दयाल? जाणून घ्या सर्वकाही

मानव सुधार

दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेत मानव सुधार या फिरकी गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. इंडिया सी संघाकडून खेळताना त्याने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात १ गडी बाद केला. तर दुसऱ्या डावात त्याने ७ गडी बाद करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एका सामन्यात ८ गडी बाद करणाऱ्या या गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मात्र त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com