

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ फेरीतील सामन्यात भारताने दमदार विजय मिळवलाय. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला बाद फेरीत पोहोचवलंय. सुपर ८ चे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिका +२.८९० च्या नेट रन रेटसह ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानावर आहे.
दरम्यान झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. इशान किशन, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची जबर धुलाई केली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने चांगली सुरुवात केली पण खूपच संथ राहिली. ब्रायन बेनेट आणि तादिवानाशे मारुमानी यांनी ६.२ षटकांत ४४ धावा जोडल्या. अक्षर पटेलने मारुमानी (२० धावा) ला बाद करून ही भागीदारी मोडली. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने डायन मायर्सला फक्त ६ धावांवर बाद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.