T20 World Cup : २००७ ची पुनरावृत्ती होणार? भारत-पाकिस्तान फायनलमध्ये भिडणार? जाणून घ्या समीकरण

स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या नेदरलँड्स संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे.
India vs Pakistan T20 world cup 2022 Final
India vs Pakistan T20 world cup 2022 FinalSaam TV

T20 World Cup 2022 : टी-२० विश्वचषक स्पर्धेत रविवारी (६ नोव्हेंबर) मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. स्पर्धेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या नेदरलँड्स संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर फेकला गेला आहे. तर आफ्रिकेच्या पराभवामुळे भारतीय संघाला (Team India) थेट सेमीफायनलचं तिकीटं मिळालं आहे.

याशिवाय बांग्लादेश आणि पाकिस्तान संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा देखील जिवंत झाल्या आहेत. रविवारचा दुसरा सामना बांग्लादेश आणि पाकिस्तान संघात सुरू झाला आहे. या सामन्यांत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. (Cricket News)

India vs Pakistan T20 world cup 2022 Final
T-20 World Cup : नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचं 'पॅकअप'; भारत थेट सेमीफायनलमध्ये, पाकच्या आशा जिवंत

भारत-पाकिस्तान फायनल लढत होणार?

दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे भारतीय संघाला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. भारताचा अजूनही साखळी फेरीतील एक सामना बाकी आहे. भारतीय संघाने जर या सामन्यांत विजय मिळवला तर ते गृप ब मधून टॉप करतील. म्हणजे काय तर त्यांचा सामना गृप अ मधील इंग्लंड संघासोबत होईल.

दुसरीकडे आजच्या सामन्यांत पाकिस्तानने बांग्लादेशला नमवलं. तर ते गृप ब मध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहचतील. सेमीफायनलमध्ये त्यांचा सामना गृप अ मधील नंबर एकचा संघ न्यूझिलंडविरोधात होईल. त्यामुळे जर पाकिस्तानने न्यूझिलंडला आणि भारताने इंग्लंडच्या संघाचा पराभव केला तर पुन्हा एका विश्वचषकात भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमने सामने येतील.

India vs Pakistan T20 world cup 2022 Final
Cricket News : श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजावर बलात्काराचा आरोप; पोलिसांनी केली अटक, क्रिडा विश्वात खळबळ

२००७ ची पुनरावृत्ती होणार?

२००७ मध्ये पहिली वहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळी भारत, पाकिस्तान एकाच गटात होते. गट साखळीत भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ८ मध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरी गाठली.

दुसरीकडे पाकिस्ताननं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले. हा सामना जिंकत भारतानं स्पर्धा जिंकली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com