Suryakumar yadav: सूर्या जाणार श्रेयस येणार? टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदासाठी ३ नावं चर्चेत

Team India captain: आयपीएल २०२६ नंतर टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रिपोर्ट्सनुसार श्रेयस अय्यरला नवीन कर्णधार बनवण्याचा विचार सुरू असून संजू सॅमसन आणि इशान किशनच्या नावाचीही चर्चा आहे.
Team India captain
Team India captainsaam tv
Published On

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतंच टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि आशिया कपचे विजेतेपदही पटकावलं. मात्र रिपोर्ट्सनुसार, सूर्याकडून टी-२० चं कर्णधारपद जाणार आहे. आयपीएल २०२६ नंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी-२० सिरीज खेळणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआय काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा विचार करतंय. यावेळी टी-२० च्या कर्णधाररदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

सूर्यकुमार यादव जवळपास दोन वर्षांपासून टी-२० टीमचा कर्णधार आहे. रोहित शर्माच्या टी-२० निवृत्तीनंतर २०२४ मध्ये त्याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, सूर्याचं कर्णधारपद जाण्याच्या मार्गावर आहे. टीम इंडियाचं भविष्य लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण नवा कर्णधार होण्याच्या शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे.

Team India captain
IPL 2026 Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, पाहा कोण कुठल्या क्रमांकावर?

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर टीममध्ये परतणार असून त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. ३१ वर्षीय अय्यरने त्याचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी खेळला होता. याचा अर्थ, तो दोन वर्षांहून अधिक काळ एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. आता भविष्याचा विचार करता निवड समिती अय्यरला नवीन कर्णधार म्हणून निवडू शकते.

Team India captain
IPL 2026 Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, पाहा कोण कुठल्या क्रमांकावर?

अजून दोन खेळाडूंच्या नावाची चर्चा

दरम्यान केवळ श्रेयस अय्यर नाही तर अजून दोन खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा होतेय. यामध्ये संजू सॅमसन आणि इशान किशन यांची नावं आहेत. टी-२० वर्ल्डकप आणि सुरु असलेल्या आयपीएलमध्ये संजूने चांगली कामगिरी केलीये. त्याचप्रमाणे सध्या टी-२० उपकर्णधार अक्षर पटेलचंही नाव देखील चर्चेत आहे.

भारताने नुकताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकप जिंकला. हे लक्षात घेता त्याला टीममधून लगेच वगळलं जाणार नाही. निवड समिती आयपीएल २०२६ नंतर नवीन कर्णधाराची निवड करू शकते. टीम इंडिया आयर्लंडमध्ये दोन टी-२० सामने खेळेल त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० सिरीज खेळणार आहे. यामध्ये सूर्याची टीममध्ये निवड केली जाऊ शकते.

Team India captain
BCCI Rules 2026: IPL मध्ये हनीट्रॅपचा धोका? बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, थेट नियमावली जाहीर

श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला होता. त्यापूर्वी २०२० मध्ये अय्यरने दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. २०२५ मध्ये त्याने पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवलं. तर अय्यरच्या कर्णधारपदाखाली पंजाब किंग्सने चांगली कामगिरी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com