Rohit Sharma On Loss: IPL मुळे गमावला WTC चा अंतिम सामना? दारुण पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

WTC Final 2023: या पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या.
rohit sharma
rohit sharmasaam tv
Published On

IND VS AUS WTC FINAL 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.

भारतीय संघाला अंतिम सामन्यात २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या.

rohit sharma
WTC Final 2023: रोहित-पुजाराची दमदार फलंदाजी; पण ऑस्ट्रेलियाने ६ चेंडूतच सामना फिरवला, टीम इंडिया बॅकफूटवर

पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

या पराभवानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,'आम्ही आयसीसीच्या अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. अनेक सामने देखील जिंकले आहेत. तरीदेखील आम्हाला यश मिळालं नाही. आम्हाला पुढे जाण्यासाठी वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी आम्हाला कमीत कमी २०-२५ दिवसांपूर्वी सराव करणं गरजेचं होतं.' भारतीय संघातील खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळून आले होते. त्यामुळे भारतीय संघाला सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

rohit sharma
WTC Final 2023: टीम इंडियाला जिंकायचं असेल तर मोडावा लागेल १२१ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा रेकॉर्ड

विजयासाठी होती ४४४ धावांची गरज..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ४४४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र शुभमन गिल १८ धावांवर बाद झाल्यानंतर रोहित शर्माने देखील ४३ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरली.

रोहित पाठोपाठ पुजाराने देखील पॅव्हेलियनची वाट धरली. अजिंक्य रहाणे आणि विराटने मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती.

मात्र शेवटच्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला. विराट कोहली आणि रविंद्र जडेजा बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या २३४ धावांवर संपुष्ठात आला. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतकी शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावांचा डोंगर उभारला होता.

पहिल्या डावात भारतीय संघाला २९६ धावा करता आल्या होत्या. मोठी आघाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात २८० धावा करून डाव घोषित केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर ४४४ धावांचे आव्हान ठेवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com