मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२४ स्पर्धेतील २५ वा सामना सुरु आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर १९६ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सला या हंगामातील दुसरा विजय मिळवण्यासाठी १९७धावांची गरज आहे.
मुंबईला जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज..
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. दोघांकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र विराट अवघ्या ३ धावा करत माघारी परतला. (cricket news in marathi)
त्याला बुमराहने इशान किशनच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने एकहाती किल्ला लढवत धावांचा गाडा पुढे नेला. डू प्लेसिसने रजत पाटीदारने मिळून अर्धशतकी भागीदारी केली. रजत पाटीदार २६ चेंडूत ५० धावा करत माघारी परतला. तर फाफ डू प्लेसिसने ४० चेंडूंचा सामना करत ६१ धावा चोपल्या. शेवटी दिनेश कार्तिकने २२ चेंडूंचा सामना करात ५३ धावा केल्या. या शानदार खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकअखेर ८ गडी बाद १९५ धावा केल्या. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावांची गरज आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात ५.२५ च्या इकोनॉमीने २१ धावा खर्च करत सर्वाधिक २१ धावा केल्या. तर गेराल्ड कोएत्जी, आकाश मधवाल आणि श्रेयस गोपालने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.