
IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. चौथ्या आणि शेवटच्या जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात स्पर्धा होती. परवा (१९ मे) हैदराबादने लखनऊचा पराभव केला आणि लखनऊचा संघ प्लेऑफमध्ये बाहेर पडला. आता मुंबई आणि दिल्ली यांच्यात शेवटच्या जागेसाठी लढत आहे.
प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आजचा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना महत्त्वाचा आहे. मुंबईचा संघ चौथ्या १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर १२ गुणांसह पंजाब पाचव्या स्थानी आहे. मुंबईने हा सामना जिंकला, तर संघ लगेच प्लेऑफमध्ये जाईल. तर दिल्लीने सामना जिंकल्यास ते प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एक पाऊल पुढे येतील.
जर मुंबईचा पराभव झाला तर?
आजचा सामना मुंबईने गमावला, तर प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अडथळा निर्माण होईल. पराभव झाल्यास मुंबईकडे फक्त १४ गुण राहतील. मुंबईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी पंजाब विरुद्धचा सामना जिंकावा लागेल. याशिवाय इतर सामन्यांमधील निकालावरही मुंबईला अवलंबून राहावे लागेल. पण हा सामना जिंकल्यास मुंबई प्लेऑफमध्ये जाईल.
दिल्ली कॅपिटल्सने आजचा सामना जिंकल्यास त्यांचे १५ गुण होतील. मुंबई प्रमाणे दिल्लीचा सामना देखील पंजाब विरुद्ध आहे. तो सामना जिंकल्यास १७ गुणांसह ते प्लेऑफमध्ये जातील. पण सामन्यात पराभव झाल्यास त्यांचे १५ गुण राहतील. शेवटी मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यावर आणि नेट रन रेटवर दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अवंलबून राहील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.