IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

IND vs ZIM 3rd T20I: भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना १० जुलै रोजी खेळला जाणार आहे.
IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण
shubman gilltwitter
Published On

टी -२०वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये पाच टी -२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेसाठी शुभमन गिलची कर्णधार म्हणून निवड केली गेली आहे. तर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान दिले गेले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कमबॅक करत शानदार विजय मिळवला आहे. दरम्यान तिसरा सामना १० जुलै रोजी होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात.

IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण
IND vs ZIM: 6,6,6,6,6..झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंगचा कहर! मोठ्या रेकॉर्डमध्ये एमएस धोनीला सोडू शकतो मागे

या मालिकेसाठी ज्यावेळी भारतीय संघाची घोषणा केली गेली. त्यावेळी शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांना देखील संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र टी २० वर्ल्डकप जिंकून परतल्यानंतर वर्कलोड मॅनेज करण्यासाठी या खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. त्यामुळे तिघे खेळाडू सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हते. मात्र तिसऱ्या सामन्यात हे तिघे खेळाडू संघासोबत जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्लेइंग ११ कोणाचा पत्ता कट होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण
IND vs ZIM: झिम्बाब्वेचा पराभव करत टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया,पाकिस्तानला मात; तोडला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रेकॉर्ड

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी -२० मालिकेतील सामने हरारेमध्ये सुरू आहेत. मालिकेतील पहिला सामना ६ जुलै रोजी खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ७ जुलै रोजी झालेल्या सामनात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आणि झिम्बाब्वेचा १०० धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने शतकी खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक झळकावलं. या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर २३४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना झिंबाब्वे संघाचा डाव अवघ्या १३४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १०० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com