IND vs ENG 1st T20I: वरुण वादळानंतर शर्माचा धावांचा 'अभिषेक'; भारतानं इंग्लंडला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं, ७ विकेट्सने चारली धूळ

India Beat England In IND vs ENG 1st T2OI: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असेलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.
वरुण वादळानंतर शर्माचा धावांचा 'अभिषेक'; भारतानं इंग्लंडला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं, ७ विकेट्सने चारली धूळ
team indiatwitter
Published On

यजमान इंग्लंडचा भारतीय खेळाडूंनी चांगलाच पाहूणचार केला आहे. इंग्लंडचा संघ ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडला १३२ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलच धुतलं. यासह भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला आहे.

वरुण वादळानंतर शर्माचा धावांचा 'अभिषेक'; भारतानं इंग्लंडला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं, ७ विकेट्सने चारली धूळ
IND vs ENG: आज रंगणार पहिल्या टी-२० चा थरार! पाहा मॅच प्रेडिक्शन, पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

इंग्लंडने केल्या १३२ धावा

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी फिल सॉल्ट आणि बेन डकेटची जोडी मैदानावर आली. या जोडीला अर्शदीप सिंगने स्वस्तात माघारी धाडलं.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने जोस ६८ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुकने १७ धावा केल्या. शेवटी जोफ्रा आर्चरने १२ धावा करत इंग्लंडचा डाव १३२ धावांपर्यंत पोहोचवला.

वरुण वादळानंतर शर्माचा धावांचा 'अभिषेक'; भारतानं इंग्लंडला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं, ७ विकेट्सने चारली धूळ
IND vs ENG: फिट असूनही शमी प्लेइंग ११ मधून बाहेर; सूर्याने सांगितलं कारण

भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १३३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानावर आली होती. संजूने आक्रमक सुरुवात करुन देत २६ धावा चोपल्या. संजू बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माच्या फळंदाजीचं वादळ पाहायला मिळालं.

त्याने या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या डावात फलंदाजी करताना त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने १९ धावा केल्या. भारतीय संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

वरुण वादळानंतर शर्माचा धावांचा 'अभिषेक'; भारतानं इंग्लंडला पहिल्याच सामन्यात पाणी पाजलं, ७ विकेट्सने चारली धूळ
IND vs ENG, Toss Update: टीम इंडियाचा टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय; सूर्याने मुख्य गोलंदाजाला बसवलं, पाहा Playing XI

मालिकेत १-० ने आघाडी

यासह शानदार विजयासह भारतीय संघाने ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना २५ जानेवारीला चेन्नईच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com