

भारतीय महिला क्रिकेट टीमने न्यूझीलंडचा पराभव करत वर्ल्ड कप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. २३ ऑक्टोबर रोजी झालेला सामना भारतासाठी 'करो या मरो' अशा स्थितीचा होता. जर भारत हा सामना हरला असता, तर महिलांना वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याची वेळ आली असती.
मात्र गुरुवारी नवी मुंबईच्या डी.वाय पाटील स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. या विजयामागे अनेक महत्त्वाची कारणं होती. मोठी धावसंख्या, अचूक गोलंदाजी आणि रणनीतीचा योग्य वापर. या मोठ्या आणि महत्त्वाच्या विजयामागील कारणांवर नजर टाकूया
भारताच्या विजयाचे सर्वात मोठं कारण म्हणजे प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांची जबरदस्त ओपनिंग पार्टनरशिर. दोघींनी मिळून २१२ रन्सची भागीदारी केली. प्रतिकाने १३४ बॉल्समध्ये १२२ रन्स केले. तर स्मृतीने ९५ चेंडूंमध्ये १०९ रन्सचीकरत शतक झळकावले. या दोघींनी मिळून २३ चौकार आणि ६ षटकार मारले, ज्यामुळे भारताने सुरुवातीलाच मजबूत स्थिती मिळवली.
या वर्ल्ड कपमध्ये जेमिमाचा खेळ फारसा चांगला झाला नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने ५५ चेंडूंमध्ये नाबाद ७६ रन्स करत जबरदस्त कमबॅक केलं. या खेळीत तिने ११ चौकार मारले.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन ही भारतासाठी मोठा धोका होती. तिने या वर्ल्ड कपमध्ये ६६.५० सरासरीने २६६ रन्स केले होते. त्यामुळे तिला लवकर बाद करणं गरजेचं होतं. हे काम रेणुका सिंहने उत्तम प्रकारे पार पाडलं आणि सोफीला केवळ ६ रन्सवर बाद केलं.
फलंदाजीनंतर भारताच्या गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली. रेणुका सिंह आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. एकूण मिळून भारताने न्यूझीलंडचे ८ विकेट्स बाद केले.
या सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला पण DLS पद्धतीचा फायदा भारताला मिळाला. भारताने ४९ ओव्हर्समध्ये ३ विकेट्स गमावून ३४० रन्स केले. यामध्ये टीम इंडियाने ३६ चौकार आणि ६ षटकार मारले. DLS नुसार, न्यूझीलंडला ४४ ओव्हर्समध्ये ३२५ रन्सचं लक्ष्य मिळालं. न्यूझीलंडने ८ विकेट्स गमावून फक्त २७१ रन्स केले आणि भारताने ५३ रन्सने विजय मिळवला.
भारताचा बांगलादेशविरुद्ध एक सामना अजून बाकी आहे पण तो जिंकूनही भारत चौथ्या स्थानावरच राहणार आहे. आता भारताला उपांत्य फेरी आणि अंतिम सामना जिंकून वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवायची आहे. सध्याच्या फॉर्मनुसार टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.