बांग्लादेशमध्ये पसरलेल्या अंतर्गत यादवीत हिंदूंना लक्ष्य करुन जीवंत जाळलं जातंय... त्याविरोधात भारतात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि बीसीसीआयनं कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू मुस्तफिजूर रहमानच्या हकालपट्टीचे आदेश दिले..... त्याविरोधात आता बांग्लादेशनं बीसीसीआयची कोंडी केलीय.... आयसीसी वर्ल्ड कपमधील भारतात होणारे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणीच बांग्लादेशनं केलीय...बांग्लादेशनं नेमकं काय म्हटलंय..
बांग्लादेशचे क्रिकेट सल्लागार असिफ नजरुल यांनी म्हटलंय की, बांग्लादेशचं क्रिकेट, क्रिकेटर आणि देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामीचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे बांग्लादेशचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत
हे सगळं एवढ्यापुरतंच मर्यादित नाही... तर बांग्लादेशनं एक पाऊल पुढं टाकत आयपीएलच्या प्रसारणावरही बंदी घातलीय.. त्यामुळं भारत बांग्लादेश तणाव आणखीच वाढण्याची शक्यता आहे..मात्र हा तणाव वाढण्याआधीच बांग्लादेशनं हिंदूंविरोधातील हिंसा रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे... अन्यथा पाकिस्तानच्या नादी लागून बांग्लादेशला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेणं परवडणारं नाही... हे मात्र निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.