
भारत आणि इंग्लंडच्या संघात पहिला कसोटी सामना लीड्समध्ये खेळला जाणार आहे. शुक्रवारी २० जून रोजी हेडिंग्लेच्या मैदानावर ५ कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. या कसोटी मालिकेला एक दिवस बाकी असतानाच टीम इंडियाच्या संघात मोठा बदल करण्यात आलाय. दरम्यान टीम इंडियाचं नेतृत्व नवीन कर्णधार शुबमन गिल करणार आहे. त्यामुळे क्रिकेट रसिकांचे लक्ष शुबमन गिल आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर असणार आहे.
भारतीय संघ कसं प्रदर्शन करणार या प्रश्नासह क्रिकेट रसिकांच्या मनात भारतीय फलंदाजी क्रमवारी बाबतही प्रश्न आहे. चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे, चौथ्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी स्वत: कर्णधार शुबमन गिल मैदानात उतरणार आहे.
हेडिंग्ले मैदानावर कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिका सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच टीम इंडियानं सराव सुरू केलाय. सराव झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत उपकर्णधार ऋषभ पंतला पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारली होती. यात पत्रकारांनी पंतला फलंदाजीच्या क्रमवारीबाबतही प्रश्न केला होता. भारतीय फलंदाजीचा क्रम कसा असेल?
चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज मैदानावर खेळण्यासाठी येईल, याचे उत्तर पंतनं दिलंय. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं कसोटी मालिका सुरू होण्याआधीच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्यामुळे विराटच्या जागेवर कोणता खेळाडू फलंदाजीसाठी येणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
कर्णधार शुबमन गिल विराट कोहलीच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरेल. ऋषभ पंतला पत्रकारांनी याबाबत प्रश्न केला होता, त्यावर उत्तर देताना पंतनं सर्व तर्कांना पूर्ण विराम दिलाय. पत्रकार परिषदेत बोलताना पंत म्हणाला की, कर्णधार शुभमन गिल चौथ्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येईल. तर मी पाचव्या नंबवर फलंदाजी करण्यासाठी येईल, असं पंतने पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना खुलासा केला.
दरम्यान शुभमन गिल सलामीवीर म्हणून फलंदाजी करायचा. त्याने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा सलामीवीर म्हणून केली होती. पण गेल्या काही दिवसांपासून तो नंबर तीनवर फलंदाजी करत होता. आता त्याच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी येताच त्याने फलंदाजीचा क्रम बदलला आहे. इतकेच नाही तर पंतचा देखील फलंदाजी क्रम बदलला आहे.
दरम्यान शुभमन गिलच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणाला पाठवले जाईल याबाबत पंतने कोणतीच माहिती दिली नाहीये. पंत म्हणाला की, या स्थानावर कोणाला पाठवले जाईल याबद्दल संघात अजूनही चर्चा सुरू आहे. या स्थानासाठी विशेषतः दोन खेळाडूंची नावे येत आहेत , यात साई सुदर्शन आणि करुण नायरच्या नावाची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.