
बर्मिंघम : शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींमध्ये अफलातून कामगिरी करत एजबेस्टनवर इतिहास रचला. भारताने इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत केलं, इंग्लंडचा दुसरा डाव २७१ धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या, दुसऱ्या डावात ६ बाद ४२७ धावांवर डाव घोषित केला. तर, इंग्लंडला पहिल्या डावात ४०७ धावांवर सिराज आणि आकाश दीपने आपल्या गोलंदाजीमुळे त्यांना रोखलं. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी तब्बल ६०८ धावांचं आव्हानं ठेवले होते. आकाश दीपने ६ विकेट घेत भारताच्या विजयाचा पाया रचला.
भारतीय क्रिकेट संघ हेडिंग्लेच्या लीड्सच्या मैदानावरील पराभवाची सल मनात घेऊन बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर उतरला होता. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीला बोलावण्याचा निर्णय घेतला. भारताच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५८७ धावा केल्या. यशस्वी जयस्वालने ८७ धावांची खेळी करत चांगली सुरुवात केली. यानंतर करुण नायर, केएल राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. याचवेळी कॅप्टन शुभमन गिल यानं रवींद्र जडेजा सोबत २०३ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने ८९ धावांची खेळी केली. शुभमन गिलने २६९ धावांची खेळी केली. भारत या जोरावर ५८७ धावांपर्यंत पोहोचला.
भारताचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातीचे ३ गडी पाठोपाठ बाद झाले. पण हॅरी ब्रूक (१५८) आणि जॅमी स्मिथ (१८४) धावांची भागीदारी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त कोणीही फारशी चांगली कामगिरी केली नाही. या डावात मोहम्मद सिराजने ६ विकेट्स आणि आकाश दीपने ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव ४०७ धावांवर संपुष्टात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.