
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईत रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला होता. या विजयासह भारताने टी -२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या मैदानावर पार पडणार आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी -२० सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर पार पडला होता. तर मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडणार आहे. या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.
त्यामुळे भारतीय संघ या सामन्यातही ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १७० इतकी आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणं फायदेशीर ठरू शकतं.
यापूर्वी झालेल्या पहिल्या टी -२० सामन्यात इंग्लंडने एक दिवसाआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली होती. मात्र यावेळी असं काही झालेलं पाहायला मिळालं नाही. गेल्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजी क्रमात काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
या सामन्यासाठी भारतीय संघातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते. त्याच्या जागी रवी बिष्णोईला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे फिरकी गोलंदाज खेळताना दिसून येऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.