

रोहित शर्मा, विराट कोहली कमी धावांमध्ये बाद झालेत. दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर चांगली खेळी करणारा शुबमन गिलही रिटायर्ड हर्ट झाला. यामुळे भारतीय चाहत्यांना पराभवाची भीती सतावत होती. टी२० मालिकेनंतर भारतीय संघाला पहिल्या एकदिवशीय सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागेल का असं वाटत होतं. परंतु अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या चिकट फलंदाजीनं भारताला पहिला विजय मिळवून दिला.
एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २५८ धावा केल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने चार गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
टी-२० मालिका संपल्यानंतर आता इंग्लंड आणि भारतीय संघ यांच्यात एकदिवसीय मालिकेसाठी आमनेसामने आलेत. या मालिकेतील पहिला सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीची सुरुवात चांगली केली. दोघांनी सलामीला ४३ धावांची भागीदारी केली. रोहितने २१ चेंडूंत ११ धावा (एका चौकारासह) केल्या, मात्र आठव्या षटकात सॅम करनने त्याला बाद केले. विराट कोहलीलाही (६ चेंडूंत ५ धावा) मोठी खेळी करता आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.