

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय झाला.
सामना जिंकल्यानंतर रोहितनं निवृत्तीचे संकेत दिले.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भागीदारीनं सामना जिंकला.
भारतीय क्रिकेट संघाने सिडनीमधील सामना जिंकलाय. या सामन्यात रोहित शर्माने नाबाद १२१ आणि विराट कोहलीनं नाबाद राहत ७४ धावा धाव केल्या. दोघांच्या धमाकेदार खेळीनं भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीचे संकेत दिलेत. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला २३६ धावांवरच रोखलं होतं. भारतानं ३८.८ षटकात ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार केले.
हे आव्हान पार करताना भारताने एक विकेट गमावली होती. यात डावात रोहितने नाबाद खेळी केली. त्याने १२५ चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि ३ षटकार मारले. तर कोहलीने ८१ चेंडूंचा सामना केला असून त्याने ७ चौकार मारले. या दोन्ही खेळाडूने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. सामना झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित शर्मानं निवृत्तीचे संकेत दिलेत.
रोहितने सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना हिटमॅन भावनिक झाला. त्याने भावनिकपणे विधान करताना निवृत्तीचे संकेत दिलेत. मला ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळणं आवडतं. माझ्या डोक्यात अजूनही २००८ची आठवण ताजी आहे. आता माहिती नाही आम्ही पु्न्हा ऑस्ट्रेलियाला परत येऊ का नाही. " आम्ही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला, मग भले आम्हाला सन्मान मिळो किंवा नाही. आम्ही पर्थमध्ये नव्याने सुरुवात केली. मी गोष्टींकडे अशाच प्रकारे पाहतो. धन्यवाद, ऑस्ट्रेलिया."
दरम्यान रोहितला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रोहितने आज एकदिवशीय ३३ वं शतक पूर्ण केलं. तर तिन्ही फॉर्मेटमधून हे एकूण ५० वे आंतरराष्ट्रीय शतक होते. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे नववे शतक होते. दरम्यान रोहितला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. रोहितचे हे एकूण ५० वे आंतरराष्ट्रीय शतक होते आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे नववे शतक होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.