WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण

WTC Final Scenario For Team India: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यानंतर कसं आहे भारतीय संघासाठी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण.
WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण
ind vs austwitter
Published On

भारतीय संघाने सलग २ वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. यावेळी सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानलं जात होतं.

मात्र आधी न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला आणि आता बॉर्डर गावसकर ट्रॉफीही गमावली. त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याचं स्वप्नं हे स्वप्नच राहिलं आहे.

WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण
IND vs AUS 5th Test: एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली

पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा धुव्वा उडविला आणि दणक्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलचा सामना ११ जूनला लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे.

ऑस्ट्रेलियाने गेल्या हंगामात जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ सलग दुसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने पहिल्यादांच या स्पर्धेची फायनल गाठली आहे.

WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण
Virat Kohli,IND vs AUS: कोहलीच्या फॉर्मची कसोटी! 14 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात असं घडलं

भारतीय संघ शर्यतीतून बाहेर

भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याची आशा जिंवत ठेवण्यासाठी हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. त्यानंतर श्रीलंकेच्या विजयावर अवलंबून राहायचं होतं. हा सामना ड्रॉ जरी झाला असता तरीदेखील भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत मालिका ३-१ ने खिशात घातली आणि फायनलचं तिकीटही मिळवलं .

WTC Final Scenario: भारतीय संघ अजूनही WTC Final मध्ये प्रवेश करु शकतो? वाचा कसं असेल समीकरण
Virat Kohli,IND vs AUS: कोहलीच्या फॉर्मची कसोटी! 14 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात असं घडलं

ऑस्ट्रेलियाचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला १८५ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ वर आटोपला. यासह भारताने ४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघाला अवघ्या १५७ धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी अवघ्या १६२ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com