
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ३ सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून यातील पहिला सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला या सामन्यात गेल्या अनेक दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा निकाल रोहित शर्माचं भविष्य ठरवणार आहे. दरम्यान रोहितनंतर टीम इंडियामधील एका खेळाडूचं नाव समोर येतंय जो कर्णधार बनू शकतो. एका वृत्तानुसार, स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लवकरच भारतीय वनडे टीमचा कर्णधार बनू शकतो. बऱ्याच काळापासून रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला भारतीय टीमचा कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं.
टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती घेतली. यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत सूर्यकुमारच्या हाती या फॉर्मेटची कमान सांभाळली. त्यावेळी हार्दिक पांड्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. दुसरीकडे युवा फलंदाज शुभमन गिलला वनडे सामन्यांमध्ये उपकर्णधारपद देण्यात आलं. याशिवाय नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी हार्दिक पंड्याच्या जागी अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आलं.
दैनिक जागरणमधील एका वृत्तानुसार, जर टीम इंडिया आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली तर हार्दिक पंड्या भारताचा नवा वनडे कर्णधार होऊ शकतो. या अहवालात असं उघड झालंय की, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना हार्दिक पंड्याला वनडे सामन्यात उपकर्णधार बनवायचं होतं.
रोहित शर्मा आणि अजित आगरकर हे शुभमन गिलची निवड करण्यावर ठाम होते. सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादव खराब फॉर्ममधून जात असल्याने हार्दिक पांड्याला पुन्हा टी-२० मध्ये कर्णधारपद देण्याची शक्यता आहे, असंही अहवालात म्हटलंय. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकप दरम्यान हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. परंतु फीटनेसचा मुद्दा पाहता त्याला महत्त्व देण्यात आलं नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.