
मध्य प्रदेशातील देवासमधील नयापुरा भागात शुक्रवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. येथील एका घराला भीषण आग लागली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. अपघातामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे कारण आणि तपशील तपासत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवास शहरातील नयापुरा भागात मदन सोलंकी यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सोलंकी यांच्या घराला भीषण आग लागली. या अपघातात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. दिनेश सुतार (35 वर्ष), गायत्री सुतार (30 वर्ष), इशिका (10 वर्ष) आणि चिराग (7 वर्ष) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
कठुआ इथल्या ज्या घराला आग लागली, त्या घरामध्ये एक सहायक मेट्रॉन आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. त्यांच्या कुटुंबात 10 जण राहत होते. यावेळी रात्री घराला आग लागल्यानंतर सगळे जण झोपले होते. नागरिक घरात झोपलेले असल्यानं त्यांना आग लागल्याची घटना लवकर कळाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरूवातीला डेअरीला लागलेली आग काही वेळातच संपूर्ण इमारतीत पसरली. या अपघातात दुसऱ्या मजल्यावर राहणारे पती, पत्नी आणि दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिनेश, त्याची पत्नी गायत्री, मुलगी इशिका आणि मुलगा चिराग अशी मृतांची नावे आहेत.दिनेश आणि गायत्री दोघे मिळून ही डेअरी चालवत असल्याची माहिती मिळतंय. डेअरीला आग नेमकी कशाने लागली याची माहिती मिळून शकली नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.