Kerala 5 People Death Case: केरळ हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, घरामध्ये 'या' अवस्थेत आढळले मृतदेह

Kerala 5 people found hanging: या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Kerala Crime News
Kerala Crime NewsSaam Tv News

Kerala Crime News: केरळमध्ये (Keral) मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह घरामध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पण त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याचा तपास केरळ पोलिसांकडून (Keral Police) सुरु आहे.

Kerala Crime News
Shubman Gill Sister Threatened: शुभमन गिलच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी, महिला आयोगाने घेतली दखल; नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातल्या चेरुवथुर येथे मंगळारी रात्री उशिरा ही घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत घरामध्ये आढळले. पती-पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. शाजी वेम्पिरिन्जन, त्याची पत्नी श्रीजा, मुलगा सुरज आणि सुजीत, तर मुलगी सुरभी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सध्या या घटनेला सामूहिक आत्महत्या असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आम्ही हत्या आहे की आत्महत्या या दोन्ही बाजूने तपास करत आहोत. 16 मे रोजीच शाजी आणि श्रीजा यांचे दुसरे लग्न झाले होते. असा अंदाज लावला जात आहे की, या पती-पत्नीने आधी आपल्या मुलांची हत्या करुन नंतर त्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवले. त्यानंतर दोघांनी देखील गळफास लावून आत्महत्या केली असावी.

Kerala Crime News
2000 RS Note Exchange In Post Office: नो टेन्शन! आता पोस्टातसुद्धा जमा करु शकता 2000 रुपयांची नोट, पण त्यासाठी...

या तिन्ही मुलांचे मृतदेह घरातील पायऱ्यांजवळ मिळाले आहेत. तर या पती-पत्नीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. ही सर्व मुलं शाजीची होती. श्रीजाचे हे पहिले लग्न होते. तर शाजीचे हे दुसरे लग्न होते. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच श्रीजासोबत दुसरे लग्न केले होते. यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी दोघांना पोलिस ठाण्यात बोलावले होते. पण पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच श्रीजाने आम्ही आत्महत्या करत असल्याचे फोन करुन पोलिसांना सांगितले होते. पण पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच सर्वांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान श्रीच्या कुटुंबीयांनी तिच्या आणि शाजीच्या नात्याला तसंच लग्नाला विरोध होता. या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com