Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात १२,००० स्पेशल ट्रेन चालवणार

Indian Railway News : दिवाळी, छठ पूजा या सणांच्या निमित्ताने अनेकजण रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेने १२,००० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Indian Railway
Indian Railwayx
Published On
Summary
  • दिवाळी आणि छठपूजेदरम्यान प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे १२,००० विशेष गाड्या चालवणार आहे.

  • या गाड्या नियमित गाड्यांमध्ये तिकीट न मिळालेल्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बर्थची सोय करतील.

  • रेल्वे प्रशासनाचा उद्देश सणासुदीला प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवणे आहे.

भारतीय रेल्वेने दिवाळी आणि छठ पूजा या सणांच्या निमित्ताने १२,००० विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना सणासुदीला त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होईल. खास म्हणजे नियमित गाड्यांमध्ये तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना अतिरिक्त बर्थची सोय करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

कामाच्या निमित्ताने अनेकजण महानगरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. काहीजण शैक्षणिक कारणांमुळे दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होतात. सणासुदीला असे अनेक लोक आपापल्या घरी जाण्यासाठी भारतीय रेल्वेचा वापर करतात. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दिवाळी आणि छट पूजेच्या वेळी १२ हजार विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

Indian Railway
Auto News : वाहनचालकांना दिलासा! २० वर्षे जुनी गाडी चालवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. येत्या दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली जाईल, असे रेल्वेमंत्री म्हणाले. प्रवाशांना परतीच्या प्रवासातही सुविधा मिळावी हेही लक्षात ठेवले पाहिजे. लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर, येत्या दिवाळी आणि छठसाठी १२ हजार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Indian Railway
Police Death : ड्युटीवर असताना छातीत दुखू लागलं, पोलीस निरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

२०२४-२०२५ या काळात होळी, उन्हाळी सुट्ट्या यादरम्यान प्रवाशांसाठी १३,५०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय १ ऑक्टोबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत दिवाळीच्या निमित्ताने ७,९९० विशेष गाड्या चालवल्या गेल्या होत्या. तब्बल १.८ कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला होता. महाकुंभमेळ्यादरम्यानही भारतीय रेल्वेने १३ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत १७,३०० हून अधिक गाड्या चालवल्या होत्या. तेव्हा अंदाजे ४.२४ कोटी प्रवाशांना रेल्वेची सेवा मिळाली होती.

Indian Railway
Actor Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा, निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com