
जम्मू-काश्मीर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर आज गुरुवारी संध्याकाळी युद्धाला तोंड फुटलं आहे. गेल्या काही तासांपासून पाकिस्ताननं लढाऊ विमानं, क्षेपणास्त्रं, ड्रोन्स, रॉकेटस् या सगळ्यानिशी भारतावर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू, श्रीनगर, राजौरी, उरी, पठाणकोट अशा सर्व ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने एकाचवेळी हल्ला चढवला होता. मात्र, प्रत्युत्तरासाठी तयार असलेल्या भारतीय सैन्याने पाकिस्तानला अक्षरश: धूळ चारली आहे. पाकिस्तानचं अत्याधुनिक एफ १६ विमानंही पाडण्यात आलेलं आहे. त्यातील दोन पायलट्सला भारताने पकडलं आहे. भारतीय लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं आहे.
भारतीय सैन्याकडून तैनात करण्यात आलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल ७० आणि शिल्का या अँटी एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्स हवेतच नष्ट केली आहेत. तर भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक एफ १६ आणि जेएफ १७ विमानंही पाडण्यात आली आहेत. एफ १६ आणि जेएफ १७ ही विमानं चीनने पाकिस्तानला दिली होती. मात्र, भारताच्या प्रतिहल्ल्यात चीनकडून मोठा गवगवा करण्यात येत असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही विमानं पाडण्यात आली आहेत.
एकीकडे पाकिस्तानी लष्कराने भारतावर हल्ला सुरु केला असताना दहशतवाद्यांनीही भारतीय सैन्यावर हल्ला चढवला आहे. राजौरी येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या १२०व्या ब्रिगेडवर आत्मघाती हल्ला केल्याची माहिती आहे. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैन्याच्या जैसलमेर येथील मुख्यालयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हल्ला अपयशी ठरला. यानंतर आता भारताने प्रतिहल्ला सुरु केला आहे. भारतीय वायदूलाची चार ते पाच लढाऊ विमानं हवेत झेपावली आहेत. ही विमानं पाकिस्तानच्या दिशेनं गेली आहेत. तसेच भारतीय सैन्याकडून लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.