
सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
नवी दिल्ली : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकला बेचिराख करून टाकलंय. एकामागून एक होणाऱ्या हवाई हल्ल्यानं मध्यरात्री पाकमधील दहशतवाद्यांना सैरावैरा पळायला भाग पाडलं. पाकिस्तानच्या सीमेतील ९ ठिकाणांवरील या 'ऑपरेशन सिंदूर'नं कित्येक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. भारतानं पाक सीमेच्या १०० किलोमीटर परिसरात हा विध्वसंक हल्ला घडवून आणला. मात्र या हल्ल्याचं नियोजन नेमकं कसं आखलं गेलं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना १६ दिवस भारतानं कशा संयमानं आणि गुप्तपणे ही रणनिती आखली, पाहूयात.
'ऑपरेशन सिंदूर' पाकवर नियोजनपूर्वक हल्ला
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे 'ऑपरेशन सिंदूर'ची जबाबदारी
पाकमधील लष्करी आणि दहशतवादी कारवायांची माहिती मिळवली
पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानंतर अचूक हल्ले करण्याचे नियोजन
राष्टीय तांत्रिक गुप्तचर संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका
अंतिम योजनेवरील चर्चेसाठी अजित डोभाल आणि पंतप्रधानांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंजुरी
विशेष कंट्रोल रूमची उभारणी
इशारा मिळताच भारतीय फाईटर जेट्स झेपावले
रात्री १२.३७ वाजता क्षेपणास्त्र डागली
हल्ल्यात दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणं उद्ध्वस्त
ऑपरेशन सिंदूर यशस्वी
देशात मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आल्यानंतर अचानक भारतानं नियोजनपूर्वक पाकवर 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. काश्मीरमध्ये माता- भगिनींच्या कपाळावरचं कूंकू पुसलं गेल होतं. मात्र आता पाकवर हल्ला करून दहशतवाद्याच्या रक्तानं पीडितांच्या कुंकवाचा बदला घेतला गेलाय. त्यामुळे भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान गर्भगळीत झाल्याचं दिसतयं. आता भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणायचा विचार जरी मनात आला तरी पाकला 'ऑपरेशन सिंदूर' नेहमीच आठवत राहिल, हे निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.