Accident News : भयंकर अपघात! देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, ५ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

Dellhi Mumbai Express Highway Accident News : राजस्थानमधील अलवर येथे धावत्या कारला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू. सीएनजी गळतीमुळे दुर्घटना झाल्याची शक्यता, चालक गंभीर जखमी.
RAJASTHAN CAR FIRE TRAGEDY: FIVE FAMILY MEMBERS BURNT ALIVE ON DELHI-MUMBAI EXPRESSWAY
RAJASTHAN CAR FIRE TRAGEDY: FIVE FAMILY MEMBERS BURNT ALIVE ON DELHI-MUMBAI EXPRESSWAYSaam Tv
Published On
Summary
  • अलवरमध्ये धावत्या कारला आग लागून पाच जणांचा मृत्यू

  • सीएनजी गळतीमुळे दुर्घटना झाल्याची शक्यता

  • चालक ८०% भाजला, जयपूरमध्ये उपचार सुरू

  • मृतांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवली जाणार

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात घडला. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांमध्ये तीन महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजपूरजवळ, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील जंक्शन क्रमांक ११५/३०० येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही इंधनावर चालत होती. प्रवासादरम्यान सीएनजी गॅसची गळती झाल्याने गाडीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

RAJASTHAN CAR FIRE TRAGEDY: FIVE FAMILY MEMBERS BURNT ALIVE ON DELHI-MUMBAI EXPRESSWAY
Shocking : अंघोळीचा साबण खाऊन २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, नाशिकमध्ये भयंकर घडलं!

मृत सर्वजण मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील चैनपुरा गावचे रहिवासी होते. ते वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेले होते आणि परतीच्या प्रवासात हा दुर्दैवी अपघात झाला. या घटनेत कारचा चालक विनोद कुमार हा धावत्या गाडीतून उडी मारून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, तो सुमारे ८० टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर पुढील उपचारासाठी जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले.

RAJASTHAN CAR FIRE TRAGEDY: FIVE FAMILY MEMBERS BURNT ALIVE ON DELHI-MUMBAI EXPRESSWAY
Shocking : “तू मला खूश कर, मी तुला जास्त दिवस सुट्टी देईन,” नामांकित कंपनीच्या बॉसची महिला कर्मचाऱ्याकडे अश्लील मागणी

घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाची पथके तात्काळ दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. मात्र, आग इतकी भीषण होती की पाचही प्रवाशांना वाचवता आले नाही. आगीत मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अलवरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com