Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी बड्या खासदाराला वेगळीच शंका; एकाचवेळी दोन्ही इंजिन बंद पडली कशी?

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला. संजय राऊत यांनी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला असून, अदानींच्या विमानतळ सुरक्षेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.
Air India Plane Crash
Air India Plane CrashSaam
Published On

अहमदाबादमधील विमान अपघातात आतापर्यंत २६५ मृतांचा आकडा समोर आला आहे. या भीषण अपघातानंतर हवाई वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा अपघात नेमका कसा घडला? या अपघातामागे कारण काय? याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. “या अपघातामागे सायबर हल्ला होता का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी हवाई सुरक्षा यंत्रणांवर संशय व्यक्त केला आहे.

राऊत म्हणाले, 'ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास सुरू आहे. ड्रीमलायनरबाबत जेव्हा करार झाला, तेव्हा भाजप पक्षाने त्यावेळेस त्यासंदर्भात शंका उपस्थित केली होती. त्या विमानाची क्षमता, इंजिन यासह अनेक विषयासंबंधित त्यांनी शंका उपस्थित केली. जेव्हा UPA सरकार सत्तेवर होतं. भाजपने त्याच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित केली होती. प्रफुल्ल पटेल यावेळी नागरी उड्डाण मंत्री होते. त्यांनी स्पष्टीकरणं दिली होती', असं त्यांनी सांगितलं.

Air India Plane Crash
Air India Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आईची धडपड, आगीत होरपळून रस्त्यावर मदतीसाठी धावली; पण शेवटी..VIDEO

यादरम्यान, सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 'एकाच वेळेला २ इंजिन बंद पडली कशी? शत्रूंकडून सायबर हल्ल्याचे अनेक प्रयत्न होत असतात. लष्कराची यंत्रणादेखील अशा हल्ल्यांना लक्ष्य होते. विमानाच्या यंत्रणेत घुसखोरी झाली का? हे सध्या तपासाच्या अधीन आहे. मी तज्ज्ञ नाही, पण मनात काही शंका आहेत. त्या आत्ता व्यक्त करणं योग्य नाही', असं संजय राऊत म्हणाले.

Air India Plane Crash
Ahmedabad Airplane Crash: 'बाबा, काळजी करू नका...', रिक्षा चालवून वडिलांनी मुलीला शिकवलं; नोकरीसाठी लंडनला पोहण्याआधीच मुलीचा करुण अंत

याच पत्रकार परिषदेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अदानी समूहावरही निशाणा साधला. 'सध्या अहमदाबाद विमानतळ कुणाच्या ताब्यात आहे? देखभाल आणि सुरक्षा कुणाकडे आहे? येथे मनुष्यबळाची कमतरता आहे,' असं म्हणत त्यांनी टीका केली. जर लोकांच्या मनातील प्रश्नांना वेळीच उत्तर दिले नाही, तर देशात विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल, अशी भीतीही राऊतांनी व्यक्त यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com