chhattisgarh News: अधिकाऱ्याचा प्रताप, शेतकऱ्यांचा संताप! IPhone साठी २१ लाख लिटर पाणी वाया घालवले; काय आहे प्रकरण?

Chhattisgarh Kanker News: अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे 1500 एकर शेताला पुरेल एवढे लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे.
Chattisgarh Viral News
Chattisgarh Viral NewsSaamtv

Chhattisgarh Viral News: मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात एकीकडे लोक पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण करत आहेत, तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे 1500 एकर शेताला पुरेल एवढे लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील आहे.

अंतागड विधानसभा मतदारसंघातील पखंजूर भागात अन्न निरीक्षकांनी पाण्यात पडलेला दीड लाख किमतीचा मोबाईल शोधण्यासाठी २१ लाख लिटर पाणी उपसल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू..

Chattisgarh Viral News
Shivsena Leader on BJP: 'आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे', शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याचं मोठं वक्तव्य

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात संतापजनक प्रकार पाहायला मिळाला आहे. पंखजूरमध्ये एका अन्न निरीक्षकाचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी लाखो लिटर धरणातील पाणी वाया घालवले आहे. एका फोनसाठी दीड हजार एकर शेतजमीन जी सिंचनाखाली आली असती तितके पाणी काढण्यात आले.

IPhone पडला धरणात...

पखंजूरमध्ये तैनात असलेले अन्न निरीक्षक राजेश विश्वास रविवारी 21 मे रोजी मित्रांसोबत परळकोट जलाशयाच्या पार्टीला गेले होते. पार्टीदरम्यान त्यांचा मोबाईल जलाशयाच्या स्केल वाईजवळ पाण्यात पडला. हा ऍपलचा आयफोन असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी अन्न निरीक्षकांनी सोमवारी सकाळपासून 'शोध मोहिम सुरू केली.

Chattisgarh Viral News
Pune Court Sentenced 3 Persons: पुणे न्यायालयाने तिघांना सुनावली मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, नेमकं काय आहे प्रकरण?

21 लाख लिटर पाणी वाया...

अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. चांगले पोहणारे उतरले. त्यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ३० एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.

गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग २४ तास ३० हॉर्स पॉवर मशीनच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. त्या अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये काय होते? ज्यासाठी सिंचनासाठी वापरणारे पाणी एवढ्या प्रमाणात वाया घालवले असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com