Surat lok Sabha :...तर आम्ही कारवाई केली असती; सूरतच्या जागेवरील बिनविरोध निवडणुकीवर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

surat lok sabha constituency : सूरत लोकसभा मतदारसंघातील बिनविरोध निवडणुवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
..तर आम्ही कारवाई केली असती; सूरतच्या जागेवरील बिनविरोध निवडणुकीवर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
Surat lok Sabha :..Saam tv

नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला होता. तर भाजप उमेदवाराचा अर्ज पात्र झाला. तर इतर उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडणून आले. यावरून विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. निकालापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार सूरतच्या लोकसभेच्या जागेवर भाष्य केलं. राजीव कुमार म्हणाले, 'आमचं मत आहे की, प्रत्येक ठिकाणी मतदान झालं पाहिजे. सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा आम्ही काय करू शकतो? त्यांना धमकावून अर्ज मागे घेतला तर आम्ही कारवाई केली असती. पण एक उमेदवार आहे, तिथे निवडणुका घेण्याचा अजून कायदा झालेला नाही'.

..तर आम्ही कारवाई केली असती; सूरतच्या जागेवरील बिनविरोध निवडणुकीवर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
Lok Sabha 2024: यंदा ६४ कोटी लोकांनी मतदान केलं; मतमोजणीची तयारी पूर्ण, निकालापूर्वी निवडणूक आयोगाने नेमकं काय सांगितलं?

जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीवर राजीव कुमार म्हणाले, 'आम्ही जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेणार आहोत. यावेळी जम्मू काश्मीर, मणिपूरमध्ये जे चित्र दिसलं, ते खूप आशादायी आहे'.

..तर आम्ही कारवाई केली असती; सूरतच्या जागेवरील बिनविरोध निवडणुकीवर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
PM Narendra Modi: कन्याकुमारीतील साधनेतून नवे संकल्प आकाराला; PM नरेंद्र मोदींचं देशवासियांना पत्र!

पोस्टल मतमोजणीवर बोलताना ते म्हणाले, ' पोस्टल मतमोजणी कुठेही आधी होते. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी सुरु होते. या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू होतात. पोस्टल मतदान कमी असल्याने आधी त्याची मतमोजणी पूर्ण होते'.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डीएम यांना १५० कॉल केल्याच्या जयराम रमेश यांच्या गंभीर आरोपावर भाष्य करताना राजीव कुमार म्हणाले, 'हे कसं होऊ शकतं? त्यांना कोणीही कॉल करु शकेल का? हे कोणी केलं, तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही त्याला शिक्षा करू. तुम्ही अफवा पसरवून सर्वांना संशयाच्या भोवऱ्यात आणता हे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com