

पश्चिम-आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत वादग्रस्त विधान केले आहे. एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देताना बासित यांनी हे विधान केलंय. "जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केले पाहिजे." एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओकली.
कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावी, असं विधान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलंय. बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचे बासित यांचे विधान तर्कहीन मानले जातंय. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते. बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिले आहेत. मात्र, थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.