Rahul Gandhi : भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका

Rahul Gandhi On BJP: सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.
भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका
Rahul Gandhi Agniveer Scheme: Saam Tv
Published On

सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. 13 जागांपैकी 10 जागा इंडिया आघाडीने जिकल्या आहेत. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला फक्त दोन जागा जिंकता आल्या. याशिवाय एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे.

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाने अनेक नेत्यांनी जल्लोष साजरा जातात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी इंडिया आघाडीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका
Sakal Election Survey: 2024 ला कुणाचं सरकार? विधानसभेवर महायुतीचा की मविआचा झेंडा? 'साम-सकाळ'च्या सर्व्हेत कल कुणाला?

पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, "7 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपने विणलेलं भीतीचे आणि संभ्रमाचं जाळं तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकरी, युवक, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करायचं आहे. लोक आता त्यांचे जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडियासोबत उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान."

पश्चिम बंगालमधील चार जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयाने ममता बॅनर्जी आनंदी आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, “अनेक कट रचले गेले. एका बाजूला केंद्रीय यंत्रणा, तर दुसरीकडे भाजप. या प्रकारची हुकूमशाही थांबवायची आहे. याच संपूर्ण श्रेय सामान्य नागरिकांना जातं.''

भय अन् भ्रमाचं जाळं तुटलं, पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांची भाजपवर खरमरीत टीका
Assembly Bypolls Results: अयोध्येपाठोपाठ बद्रीनाथमध्येही भाजपचा मोठा पराभव, पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा दणदणीत विजय

द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही इंडिया आघाडीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''भाजपने पराभवातून धडा घेतला पाहिजे. प्रादेशिक भावनांचा आदर केल्याशिवाय भाजप सरकार आणि पक्ष चालवू शकत नाही, हे भाजपने समजून घेतले पाहिजे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com