Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा

Today Maharashtra Weather Update News : मकर संक्रांतीनंतर राज्यात थंडी कमी झाली असून किमान तापमानात वाढ होत आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा धोका वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा
Mahrashtra Weather UpdateSaam Tv
Published On
Summary
  • मकर संक्रांतीनंतर राज्यात थंडीचा गारठा कमी झाला आहे

  • किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा जाणवत आहे

  • ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

  • हवामान बदलामुळे स्वाईन फ्लूसह आजारांचा धोका वाढला आहे

राज्यात मकर संक्रांतीनंतर थंडी कमी झालेली पाहायला मिळते आहे. किमान तापमानात सतत होणाऱ्या चढ उतारामुळे वातावरणातील गारठा काहीसा कमी झाला आहे. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अंशतः ढगाळ हवामान होत आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढून, काहीसा उकाडा अनुभवायला मिळत आहे. किमान तापमानात वाढ कायम राहणार असून थंडी कमी - अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा
Avinash Jadhav : "₹३०० चा हप्ता घेतात अन्..." व्यवसाय करणाऱ्या मराठमोळ्या तरूणीला डोंबिवलीत त्रास, राज ठाकरेंचा आदेश येताच....

वातावरणात सतत होणाऱ्या बदलावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ऐन थंडीत उन्हाचा चटका आणि अवकाळी पडणारा पाऊस अशा संमिश्र वातावरणाने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा
Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं

बदलत्या वातावरणाचे आजारांना निमंत्रण

नागपूरमध्ये नववर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच स्वाइन फ्ल्यूचे रुग्ण समोर आले असून शहरात स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून थंडीच्या काळात विषाणूजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. शिवाय थंडीचा काळ स्वाईन फ्लूसाठी पोषक ठरणारा असतो तापमान घटल्याने संसर्ग वाढण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

Maharashtra Weather : राज्यातून थंडी गायब? सतत बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांना फटका; जाणून घ्या, हवामान विभागाचा इशारा
Pune Accident : क्षणात होत्याचं नव्हतं झालं! पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

दिल्लीतील वातावरण बदलले

दिल्लीतील हवामानाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सियस इतकी घट झालेली पाहायला मिळाली. त्यांनतर काल दिल्लीतील अनेक भागात पावसाने दमदार बॅटिंग केली. दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे फिरायला गेलेल्या नागरिक मात्र पेचात सापडले. ऐन थंडीत सुरु झालेल्या पावसामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com