समुद्रात पोहायला गेलेले तीन तरुण पाण्यात बुडाले, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि...
kalamb Beach
kalamb BeachSaam Tv

मुंबई : निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमीच समुद्र किनाऱ्यावर विसावा घेण्यासाठी जातात. पण समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि दुर्देवाने (water drowning) पाण्यात बुडाल्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर (Nalasopara Beach) घडल्याचं समोर आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले तीन तरुण समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.

kalamb Beach
Maharashtra Government : शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलं; 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

या घटनेची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक आणि निखित निजाई यांनी जीवाची पर्वा न करता समुद्राच्या पाण्यात जाऊन दोन तरुणांना वाचवलं. परंतु, एकाचा दुर्देवाने मृत्यू झाला. सईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०)आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) यांना जीव वाचला. तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

kalamb Beach
Enforcement Directorate : अविनाश भोसले आणि संजय छाब्रिया यांच्या ४१५ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित, राहुल आणि राजन हे तिघेही समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी समुद्राल आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन जीवाची पर्वा न करता दोघांना रोहित आणि राहुलला वाचवले. पण दुर्देवाने त्यावेळी राजन पाण्यात सापडला नाही. आज दुपारी एकच्या सुमारास राजनचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळला. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com