

ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आता उन्हाच्या वाढत्या तापमानासोबत नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे ठाणे करांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन देण्यात आले आहे.
ठाण्यातील काही भागांमध्ये येत्या २१ मे २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ते २२ मे २०२६ दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. याचं कारण म्हणजे, एमआयडीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय परिसरात बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक १,२ आणि ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण आणि काही दुरुस्तीची कामे करण्यात येतील.
पाणीपुरवठा बंद झाल्याचा परिणाम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा आणि वागळे परिसरातल्या काही भागांवर परिणाम होणार आहे. दिवा आणि कळवा प्रभाग समितीतल सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मुंब्रा परिसरात प्रभाग क्र. २६ आटणि ३१ मधील काही भाग वगळता इतर बहुतांश भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत राहील.
वागळे प्रभाग समितीअंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरूनगर या भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. तर मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव परिसरातही 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
23 एप्रिल 2026 रोजी जलसंपदा विभाग आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत आंध्रा आणि बारवी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यातील तूट तसेच आगामी काळात कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी वापराचे योग्य नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाणीपुरवठा व्यवस्थेच्या देखभालीसाठी काही तातडीची कामे करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.