Supriya Sule News : 'वैयक्तिक कामांसाठी दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदतसाठी...'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा

Supriya Sule News : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य महायुती सरकारवर केली आहे.
Supriya Sule News : 'वैयक्तिक कामांसाठी दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदतसाठी...'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा
Published On

Mumbai News :

राज्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे, अशी टीका देखील सुप्रिया सुळे यांनी राज्य महायुती सरकारवर केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Supriya Sule News : 'वैयक्तिक कामांसाठी दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदतसाठी...'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा
Unseasonal Rain: राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा; लाखो हेक्टरवरील पिकांची माती, बळीराजा संकटात

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. अशावेळी शासनाने त्यांना मदतीचा हात देऊन उभा करायला हवे. परंतु सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कसलीही काळजी नाही असे स्पष्ट दिसते.

पालकमंत्रीपदाची भांडणं सोडवायला दिल्लीची वाट दिसते पण शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी यांना दिल्ली दिसत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

Supriya Sule News : 'वैयक्तिक कामांसाठी दिल्लीची वाट दिसते, पण शेतकऱ्यांना मदतसाठी...'; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारवर निशाणा
Milk Price: येवल्यात मुख्यमंत्री, उपमुख्यत्र्यांचा फोटोला दुग्धाभिषेक; धाराशिवमध्ये रस्त्यावर ओतले दूध

जेव्हा या सरकारमधील नेत्यांची वैयक्तिक कामे असतात तेव्हा विनाविलंब ते दिल्लीला पळतात. मग शेतकऱ्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्र सरकारने दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत आणली पाहिजे व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com