Maratha Reservation : महाराष्ट्राची एकजूट दाखवा; मराठा आरक्षणाचा मुद्दा थेट PM मोदींसमोर मांडा; राज्यातील केंद्रीय मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचं आवाहन

Maratha Reservation Andolan : महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची ही वेळ असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysaam tv
Published On

Maratha Aarakshan News :

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खासदारांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची ही वेळ असल्याचं  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला पाहिजे. आता थेट पंतप्रधान मोदींना म्हटलं पाहिजे, आतापर्यंत तुमची मन की बात ऐकली, आता जनतेचं म्हणणं ऐका. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवा. अन्यथा राजीनामा देतो, असं केद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांना थेट सांगितलं पाहिजे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: 'सरत्या वर्षासह अपात्र सरकारलाही निरोप देऊ..' सुप्रीम सुनावणीनंतर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा

विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन विषय सुटत असेल तर जरुर घ्या. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा विषय लोकसभेत सोडवण्यासारखा आहे. आमदार आणि खासदार यांनी राजीनामा देऊन काही फरक पडणार नाही. संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा. केंद्रात तोडगा निघाला नाही तर ४८ खासदारांनी राजीनामा द्यावा.

महाराष्ट्राची ताकद काय ते दाखवून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच हा मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जायला केव्हाही तयार आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav Thackeray
Maratha Reservation: शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का; आरक्षणासाठी मराठवाड्यातील आमदाराचा राजीनामा

राज्य पेटलं असताना उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त

मराठा आरक्षणाविषयीची काल बैठक पार पडली. त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एकाला डेंग्यू झालाय तर दुसरे प्रचाराला बाहेर होते. देवेंद्र फडणवीस यांना प्रचार महत्त्वाचा वाटतोय. राज्य पेटलं असताना उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहे, असे लोक आरक्षण देऊ शकतात का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठा तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये

मनोज जरांगे यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, टोकाचं पाऊल उचलू नये. तुमची समाजाला गरज आहे. तरुणांनी देखील आत्महत्या करुन नये. हिंसक आंदोलन करु नये. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम आधीच सुरु आहे. मराठा समाजाला न्याय हक्क मिळालाच पाहिजे, यात दुमत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com