VIDEO: उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा

Uddhav Thackeray Criticized Maharashtra Government: 'उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. हे खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असणार आहे.', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकेर (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे यांच्यासह मतदान केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकावर जोरदार टीका केली. 'उद्यापासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. हे खोके सरकारचे शेवटचे अधिवेशन असणार आहे. अधिवेशनात खोके सरकारला निरोप द्यायाचा आहे.', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. तसंच, 'निवडणूक असल्यामुळे आज राजकीय विषयावर भाष्य करणार नाही. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राजकीय भाष्य करेन.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक महायुती सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांना चहापानांचे निमंत्रण देण्यात आले होते. पण विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com