Maharashtra Politics: हाथरस दुर्घटनेनंतर गुन्हा, मग खारघर दुर्घटनेत का नाही? भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? संजय राऊत आक्रमक VIDEO

Sanjay Raut On Kharghar Accident Criticized CM Eknath Shinde: हाथरस दुर्घटनेनंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे आता खारघर दुर्घटनेवरून संजय राऊत आक्रमक झालेत. दुर्घटनांची चौकशी करण्यावेळी सरकार धुळफेक करत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
संजय राऊत
Sanjay RautSaam Tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही मुंबई

हाथरस प्रकरणानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आता खारघर दुर्घटनेवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संजय राऊतांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारने आता खारघरचा विषय आता मागे टाकला आहे. खारघरला जे भाविक मरण पावले, ते अत्यंत दुर्दैवी होतं. त्या कार्यक्रमाला गृहमंत्री, मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते.

पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. एसआयटी नेमणं हे फक्त धुळफेक असते, अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नेमतं, तेव्हा ती धुळफेक (Maharashtra Politics) असते. इतक्या भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असं म्हणत त्यांनी सरकावर निशाणा साधला आहे. सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, असं देखील संजय राऊत म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो भाविक जमले होते. त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातून ती दुर्घटना झाल्याचं राऊतांनी म्हटलंय. हाथरस प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांनी त्याठिकाणी गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे, ज्याच्यामुळे हे घडलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही. कारण त्यांना राजकीय संरक्षण असल्याचं संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut On Kharghar Accident) आहेत.

ऐंशी हजार लोकांना परवानगी असताना अडीच लाख लोक तिथे कशी जमली? महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्र आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी (Kharghar Accident) आहेत, त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात. या देशाचा पंतप्रधानाच मोठा बुवा आहे, भोंदुगिरी तिथून सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊत
Sanjay Raut News: दिंडीला 20 हजार देऊन वारकरी खरेदी? राऊतांनी शिंदेवर केलेला नेमका आरोप काय?

तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणवून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीच आहे. देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय कराल, असा घणाघात राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदार घेऊन आसामला जातात. कामाख्या देवीकडे रेडे कापतात, यांच्यावरती कोण कारवाई करणार? कायद्याने यांच्यावरती कारवाई का होत (Hathras Accident) नाही. जिथे अंधश्रद्धा आहे, तिथे राज्यकर्ते जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. लोक हतबल असल्यामुळे महागाई, बेरोजगारी, गरिबी असे प्रश्न घेऊन भोंदू लोकांकडे जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते भोंदूगिरीतून मिळाली असल्याची टीका राऊतांनी केलाय.

संजय राऊत
Sanjay Raut News: 'बालबुध्दीच्या नेत्यानेच तुमचा बुरखा फाडला', संजय राऊतांचे PM मोदींवर टीकास्त्र; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com