Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी

Vaitarna, Tansa, Bhatsa Dam Water Level Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये ६६. ७७ टक्के पाणीसाठी जमा झाला आहे. धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता लवकरच मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी
Mumbai Dam Water LevelSaam TV
Published On

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ४ जलाशये काठोकाठ भरली आहेत. तुलसी, विहारनंतर आता तानसा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तर मोडकसागर देखील ओव्हर फ्लो होण्याच्या मार्गावर आहे. या धरणामध्ये सध्या ९८.६६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सातही जलाशयांमध्ये ६६. ७७ टक्के पाणीसाठी जमा झाला आहे. धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता लवकरच मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी
Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा खोळंबली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल; पाहा VIDEO

मुंबई महानगर पालिकेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ६६. ७७ टक्के इतका झाला आहे. २५ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९,६६,३९५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ६६. ७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ७,९८,७०४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ५५.१८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी
Mumbai Rain News : मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात साचलं पाणी

मुंबई शहर आणि उपनगराला ५ धरण आणि २ तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामधील तुलसी, विहार, तानसा हे जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी
Mumbai Traffic: ऑफिसला जा उडत ! मुंबईकरांची होणार ट्रॅफिकपासून सुटका?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ३४.१३ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ९८.६६ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९९.१८ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ६३.३२ टक्के पाणीसाठा

- भातसा - ६४.०९ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी
Mumbai Dam Water Level: टेन्शन खल्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा ओव्हर फ्लो, इतर धरणांमध्ये किती पाणीसाठा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com