No Water Cut in Mumbai: मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?

Mumbai Dam Water Level: येत्या २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाणीकपात मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे.
No Water Cut in Mumbai : मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?
Mumbai Water Supply Saam Tv
Published On

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईवरील पाणी संकट दूर होणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. सात जलाशयांपैकी ३ जलाशये ओव्हर फ्लो झाली आहेत. तर इतर जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे येत्या २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात येणार आहे. मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाणीकपात मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाणी टेन्शन दूर होणआर आहे.

मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ७१.०२ टक्के इतका झाला आहे. २६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०,२७,९२५ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ७१.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ८,५२,९५७ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच ५८.९२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोडकसार धरण, विहार तलाव आणि तुलसी तलाव हे ओव्हर फ्लो झाले आहेत. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत या सातही जलाशयांमधील पाणीसाठा जास्त आहे.

No Water Cut in Mumbai : मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ जलाशये काठोकाठ भरली; धरणात किती टक्के पाणीसाठा?, वाचा ताजी आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगराला ५ धरण आणि २ तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यासातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.

No Water Cut in Mumbai : मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?
Mumbai Rain Alert: मुंबईसह उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी; दुपारी मुंबईच्या समुद्राला भरती!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ३१.४१ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - १०० टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९८.६१ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ६९.४० टक्के पाणीसाठा

- भातसा - ६९.२० टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

No Water Cut in Mumbai : मुंबईतील पाणीकपात रद्द; कधीपासून आणि धरणांमध्ये पाणीसाठा किती?
Mumbai Crime: २२ टॅटू, गुटखा आणि ऑनलाइन पेमेंट; स्पा सेंटरमध्ये चुलबुल पांडेच्या हत्येचा असा झाला पर्दाफाश!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com