मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने माघार घेतली आहे. उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज परत घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. आम्ही अर्ज परत घेत आहोत, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मुरजी पटले हे अपक्ष देखील निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रमेश लटके यांना आदरांजली म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. पराभव दिसत असताना माघार घेतली असं कुणाला वाटत असले तर त्यांना 2024 मध्ये दाखवून देऊ असं आव्हानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. (Maharashtra News)
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करु नका, असा सल्लाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. तसेच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. (Breaking Marathi News)
मात्र केवळ शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर भाजपने ही माघार घेतली आहेत की इतरही कारणं आहेत याबाबत आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. पराभवाच्या भीतीने भाजपने सर्व तयारी करुन या निवडणुकीतून माघार घेतली का? अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत.
भाजपचं हे सुसंस्कृत राजकारण असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एवढा वेळ का घेतला. त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यानेच भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.