Diwali guidelines 2023: दिवाळीत फक्त २ तास फटाके फोडता येणार, BMC आयुक्तांनी फटाके फोडण्याच्या नियमाविषयी दिली सविस्तर माहिती

Diwali guidelines 2023: मुंबईकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे.
BMC News
BMC Newssaam tv
Published On

Mumbai News:

मुंबईतील हवामान बदलामुळे वायू प्रदुषणात वाढ झाल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजना महानगरपालिकेने हाती घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी सणामध्ये सायंकाळी ८ ते रात्री १० या कालावधीतच फटाके फोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर आता मुंबईकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

मुंबईकरांना आवाहन करताना चहल यांनी म्हटलं की, 'यंदाचा दिवाळी सण सुरू झाला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, यंदाच्या दिवाळीत सायंकाळी ८ ते रात्री १० या कालावधीतच फटाके फोडावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. तसेच कमी आवाज होणारे आणि कमी प्रदूषण करणारेच फटाके फोडावे, असे विनम्र आवाहन आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BMC News
Mumbai Pollution: 'प्रदूषणावर उपाययोजना करुन 'मुंबईकरांवर' उपकार करत नाही...' हायकोर्टाने महापालिका अन् राज्य सरकारला झापले

चहल म्हणाले, 'बांधकामांमधून उडणारी धूळ आणि इतर कारणांनी वायू प्रदूषण वाढलं आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कार्यवाहीला लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे. कारण म्हणजे लोकचळवळीतून केलेले कामकाज नक्कीच यशस्वी होते. पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर नियम लागू केले आहेत'.

'धूळ पसरु नये म्हणून वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत. त्याचा चांगला परिणाम देखील दिसत आहे. मात्र, हे काम पालिकेकडून करून चालणार नाही. पालिकेच्या प्रयत्नांना सर्व नागरिकांचे सहकार्य आणि सहभागाची जोड मिळाली तर प्रदूषण निश्चितच रोखता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

BMC News
Rain in Maharashtra: ऐन दिवाळीत अवकाळी पाऊस! बाजारात खरेदीसाठी आलेल्या लोकांची उडाली धांदल, पुढील ४८ तासांत राज्यातील हवामान कसं असेल?

'उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दिवाळीत नागरिकांनी सायंकाळी ८ ते १० या वेळेतच फटाके फोडावेत. दिवाळीत कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण या सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो, असे आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

'सर्व नागरिकांनी पालन केले तर वायू प्रदूषण टाळणे शक्य होईल. कोविड कालावधीमध्ये देखील पालिकेच्या विनंतीमुळे मुंबईकरांनी फटाके फोडणे टाळलं होतं, तेव्हाही प्रतिसाद दिला होता, असं चहल यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com