Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?

Mumbai Rain And Dam Water Level Update: गेल्या अडीच महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे.
Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?
Mumbai Dam Water LevelSaam TV
Published On

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईत पावासाने विश्रांती घेतली असली तरी देखील मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या अडीच महिन्यात धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे ही धरणं पूर्णपणे भरली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. कोणत्या धरणांमध्ये सध्या किती टक्के पाणीसाठा आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

मुंबई महानगर पालिकेने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,२०,६१४ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९८.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १४,२६,४९४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९८.५६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा थोडासा कमी असल्याचे दिसत आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?
Mumbai University Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या अडीच महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्या धरणक्षेत्रात पाऊस पडत नाहीये.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरववठा केला जातो. या धरणांमधील पाणीसाठा वाढल्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?
Mumbai News: धक्कादायक! वांद्रे वरळी सी-लिंकवरून उडी मारुन कॅब चालकाची आत्महत्या; कारण काय?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९९.१५ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ९४.२६ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९६.९९ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९८.८२ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९८.५१ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - ९९.०५ टक्के पाणीसाठा.

Mumbai Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ९८ टक्के पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी वाचा आकडेवारी?
Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com